- शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी स्वतःला या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
- त्यावेळी पाटील यांनी अत्यंत भावनिक आवाहन करत म्हटले होते की, “पवार साहेबांनी मला अनेक संधी दिल्या, सात वर्षे मी या पदावर काम केले. आता नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुमच्यासमोरच मी साहेबांना विनंती करतो.”
- त्यानंतर, पाटलांनी आज शरद पवारांकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे आणि १५ जुलै रोजी नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल, असे वृत्त आहे. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे राजीनाम्याचे वृत्त “निव्वळ खोडसाळपणाचे” असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढला आहे.
- पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून शशिकांत शिंदे यांची या पदावर निवड होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर बोलताना शिंदे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्षपदाबद्दल अजून कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. पवार साहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. १५ तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावे चर्चेत आहेत आणि माझे नावही त्यात आहे. जेव्हा निर्णय होईल, निवड होईल, तेव्हा निश्चितपणे काम करू. असे असले तरी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाटलांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
ब्रेकिंग! शरद पवारांनी भाकरी फिरवलीच नाही
