क्राईम

मामाच्या प्रेमात आकंठ बुडाली, लग्नाच्या दीड महिन्यातच पतीला संपवले

  • इंदूरमधील हनिमून कपल राजा रघुवंशीच्या हत्येने अवघा देश हादरुन गेला आहे. प्रेम प्रकरणावरुन पत्नीनेच पतीचा काटा काढल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली असून लग्नाच्या 45 दिवसातच नवरीने पतीला संपवल्याने खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून नवरीने हे धक्कादायक कृत्य केले आहे.
  • बिहारमधील रहिवासी प्रियांशूची त्याच्याच पत्नीने हत्या केली. ही खळबळजनक घटना राज्यातील औरंगाबाद येथील आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील नवीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारवान गावातील रहिवासी 25 वर्षीय प्रियांशू उर्फ छोटूचे लग्न दोन महिन्यांपूर्वी झाले होते. तो 25 जून रोजी आपल्या बहिणीला भेटून परत येत होता. तो रेल्वेने नवीनगर स्टेशनवर पोहोचला आणि त्याने आपल्या पत्नीला घरी यायचे असल्याने बाईकवर कोणाला तरी पाठवण्यास सांगितले. बाईकवरून परतताना दोन अज्ञात लोकांनी त्याची हत्या केली.
  • हत्येनंतर पत्नी गावातून पळून जाऊ इच्छित होती, कुटुंबातील सदस्यांना संशय आला. पोलिसांनाही तिच्यावरच संशय होता. यावरुनच तपास करत असतानाच कॉल डिटेल्सवरून संपूर्ण गुपित उघड झाले. पत्नी ज्या नंबरवर सतत बोलत होती तो तिच्या सख्ख्या आत्याच्या पतीचा होता. तो सतत गोळीबार करणाऱ्यांच्या संपर्कात होता. त्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान संपूर्ण गुपित उघड झाले.
  • वधू तिच्या सख्ख्या मामांवर (आत्याचा पती) प्रेम करत होती. दोघांचे प्रेम प्रकरण सुरु होते. तिला त्याच्यासोबत राहायचे होते. तिने हे तिच्या कुटुंबालाही सांगितले होते. परंतु जेव्हा तिचे जबरदस्तीने लग्न करण्यात आले, तेव्हा तिने नवऱ्यापासून सुटका करून घेण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच मामा आणि वधूने मिळून प्रियांशची हत्या केली.

Related Articles

Back to top button