क्राईम

ट्रेनमधील चहा विक्रेत्याचं एक वाक्य अन् होत्याचं नव्हतं झालं

आगीच्या अफवेने ट्रेनमधून उतरलेल्या प्रवाशांना दुसऱ्या एक्सप्रेसने उडवल्याची धक्कादायक घटना काल जळगावमध्ये घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लखनऊहून मुंबईहकडे निघालेली पुष्पक एक्सप्रेस ही गाडी परधाडे स्थानकाजवळ येत असताना ही मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसने स्टेशन जवळ आल्यानंतर ब्रेक मारला, ज्यामुळे चाके आणि रुळामध्ये घर्षण झाले आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या पाहून काही प्रवाशांना ट्रेनला आग लागली, असे वाटले. गाडीतील प्रवाशांना एका चहा विक्रेत्याने आग लागल्याची माहिती दिली आणि प्रवाशांचा धीर सुटला.

या प्रवाशांनी ट्रेनमध्ये आग लागली, आग लागली अशी बातमी जनरल डब्यात सर्वत्र पसरवली, ज्यामुळे गाडीतील प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. यावेळी आगीच्या भितीने काही जणांनी चेन खेचून गाडी थांबवली. गाडी थांबल्यानंतर 30- 35 प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. मात्र, याचवेळी दुसऱ्या दिशेने कर्नाटक एक्सप्रेस येत होती, ज्याखाली पुष्पक एक्सप्रेसमधील अनेक प्रवासी चिरडले गेले. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला. 

Related Articles

Back to top button