राजकीय
महाविकास आघाडीचेच ठरेना, त्यात मित्र पक्षाचा अल्टिमेटम

- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अजून तिढा सुटलेला नाही. त्यामुळे मोठी बंडखोरी शक्यता आहे. समाजवादी पार्टीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसोबतच्या जागांच्या मागणीबाबत शेवटचा अल्टिमेटम दिला आहे.
- समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणाले की, आम्ही पाच उमेदवार जाहीर केले असून ते विजयी होणार आहेत. जर महाविकास आघाडीने आम्हाला पाच जागा दिल्या नाहीत तर माझ्याकडे 25 उमेदवार तयार आहेत, ज्यांना मी निवडणुकीत उभे करणार असल्याचे आझमी यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा जो गोंधळ सुरु आहे. ते चुकीचे आहे.
- समाजवादी पक्षाने पाच जागांची मागणी करत महाविकास आघाडीला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास सपा महाविकास आघाडीच्या बाहेर पडून 25 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आझमी यांनी सपाच्या दोन विद्यमान जागा (भिवंडी पूर्व आणि मानखुर्द) सह तीन अतिरिक्त जागा भिवंडी पश्चिम, मालेगाव आणि धुळे शहर) पाच जागांची मागणी केली.