राजकीय

अमित शहांची टीका जिव्हारी लागली नाही, कारण…

शिर्डीतील भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. १९७८ पासून शरद पवारांनी दगा फटक्याचे राजकारण सुरू केले, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले, अशी टीका शहा यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर आज पवार यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे.

अनेक चांगले प्रशासक आणि गृहमंत्री देशाने पाहिले आहेत. आधीच्या राजकीय नेत्यांमध्ये सुसंवाद होता, आता तसे दिसत नाही. जनसंघाच्या लोकांनी आमच्यासोबत काम केले. परंतु, आता शिर्डीतील अधिवेशनात शहा यांनी उद्धव ठाकरे आणि माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत.

देशात अनेक गृहमंत्री झाले. पण कुणालाही तडीपार केलेले नव्हते. शहा यांनी माझ्यावर केलेली टीका मला जिव्हारी लागली नाही. कारण शहा काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही. शहा यांनी गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, तेव्हा त्यांनी बाळासाहेबांचा आसरा घेतला, अशा शब्दांत पवार यांनी शहांना प्रत्युत्तर दिले.

Related Articles

Back to top button