क्राईम
गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल तर मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय?

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्याला अटक करण्यात यावी, यासाठी आंदोलन देखील उभारण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कराडच्या शोधात होते. अशात आज वाल्मिक स्वतः पुण्यात सीआयडीला शरण गेला आहे.
- दरम्यान वाल्मिकच्या अटकेनंतर देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
- आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. पोलीस यंत्रणा काम करतेय, मग इतका वेळ का लागतोय? गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय?आरोपींना पकडायला इतका वेळ का लागतोय? मग, आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार?, असे सवाल वैभवी यांनी उपस्थित केले.
- माझ्या वडिलांची ज्यांनी क्रूर हत्या केली, त्यांना अटक करा. जे तीन आरोपी फरार आहेत, त्यांना अटक करा. लवकरात लवकर न्याय द्या, अशी मागणी वैभवी यांनी केली आहे.