सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! तुझ्या भिशीमुळेच मी कर्जबाजारी झालो, पती भडकला

- सोलापूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. तुझ्या भिशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे, असा आक्षेप अनंत साळुंखे याचा आपल्या पत्नीवर होता. यावरून तो सतत पत्नी बरोबर भांडण करत होता.
- पत्नी मनिषा यांनाही आपले पती असे का म्हणत आहे याची कल्पना नव्हती. त्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण पतीच्या डोक्यात ती एकच गोष्टी फिट झाली होती.
- याच रागातून पती अनंतने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने पत्नीला व मुलाला गाडीवर बसवून शेतात नेले. तिथे त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळला. त्यावर त्याचे मन भागले नाही. त्याने तिच्यावर चाकूने वार केले. पुढे तर दगडाने तिला ठेचले.
- त्यात तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने आपला मोर्चा मुलाकडे वळवला. त्याने मुलावरही चाकूने सपासप वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला.
- हा सर्व प्रकार बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी शिवारात घडला आहे. यात मनीषा यांचा जागीच मृत्यू झाला. त्या अनंत साळुंखेच्या पत्नी होत्या. तर त्यांचा मुलगा तेजस साळुंखे हा या हल्लात जखमी झाला आहे. याप्रकरणी अनंत साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक केली आहे.