देश - विदेश
ब्रेकिंग! भारताच्या वाघांनी पाकिस्तानची पुन्हा जिरवली

- पाकिस्तानी सैन्याने आज पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेत ड्रोनने बीएसएफच्या छावणीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणीही भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे ड्रोन हाणून पाडले. भारताच्या एअर डिफेन्सने काल रात्रीपासून पाकिस्तानचे जवळपास 50 स्वार्म ड्रोन्स आणि अनेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी होऊ शकलेला नाही, हे भारतीय लष्कराच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे.
- दरम्यान पहलगाममध्ये दहशतवाद हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. आता दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष सुरू झाला आहे. भारताने हवाई हल्ल्यांद्वारे त्यांचे अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह अनेक वेगवेगळ्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने हाणून पाडला.



