विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहे. आज त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऑफर दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. उद्धवजी आता 2029 पर्यंत काही करायचे नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, असे फडणवीस म्हणाले.
अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. त्यांनी भोंग्याविरोधात अनेक निवेदने दिली. ते कट्टर सावरकरवादी आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत, असे फडणवीस म्हणाले.