ब्रेकिंग! राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठा ड्रामा

Admin
2 Min Read
  1. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार असल्याचे संकेत आज वर्धापन दिनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. सुरूवातीला पाटील यांनी त्यांच्या भाषणाची दमदार सुरूवात केली. यावेळी त्यांनी ‘अभी भी पवार साहब का डर बाकी है’ असे म्हणत सत्ताधाऱ्यांना टप्प्यात घेतले. मात्र, भाषणाच्या शेवटी पवार साहेबांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असे म्हणत पाटील यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार का? आणि अध्यक्षपदाची संधी कुणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
  2. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. पक्ष २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. देशपातळीवर या पक्षाने मोठ योगदान दिले आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून देश संकटात असते तेव्हा एक व्हायचे असते, असे पवारांनी सांगितले असे म्हणत पाटलांनी ऑपरेशन सिंधूरबाबत जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळवर भाष्य केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ गेले. त्यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडल्याचेही पाटील म्हणाले.
  3. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाषणाच्या शेवटी पाटलांनी कार्यमुक्त करण्याचे संकेत दिले. त्याचवेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. नव्यांना संधी द्या, असे म्हणताच कार्यकर्ते नाही नाही म्हणत उठले. त्यावेळी पाटील यांनी, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असे म्हणत भाषण थांबवले.
Share This Article