देश - विदेश

ब्रेकिंग! आसाममध्ये काँग्रेसला भगदाड

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून निघून जाताच काँग्रेस पक्षाला राज्यात तगडा झटका बसला आहे. आसाममध्ये AASU म्हणजेच ऑल आसाम स्टुडेंट्स युनियन आणि काँग्रेसच्या दीडशेहून अधिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सध्या काँग्रेसची यात्रा तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आहे.
राज्यातील मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसचे दीडशेहून अधिक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. काँग्रेसला त्यांनी उपरोधिक टोला लगावला. राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रेचा आसाममध्ये खूप प्रभाव पडला आहे हे आम्हाला मान्य करावे लागत आहे. आसाम काँग्रेस आणि AASU च्या दीडशेहून अधिक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अंकिता दत्ता, बिस्मिता गोगोई आणि दीपांक कुमार नाथ यांनी चांगला निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

Back to top button