महाराष्ट्र

ग्रामपंचायतींमध्ये आम्हीच सर्वांत मोठा पक्ष, सर्व पक्षांचे दावे

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने दणदणीत यश मिळवले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट या महाविकास आघाडीला त्यांनी जोरदार धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
राज्यात पुन्हा एकदा भाजप नंबर 1. ग्रामपंचायतीचे सुमारे 7000 निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. सर्वाधिक 2348 जागा जिंकून भाजप पुन्हा एकदा क्रमांक 1 चा पक्ष बनला आहे आणि भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला 842 जागांवर यश मिळाले असून भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मिळून 3190 जागांवर दणदणीत यश मिळाले आहे.
ठाकरे गटाला 637, काँग्रेसला 809 तर राष्ट्रवादीला 1287 जागांवर समाधान मानावे लागले आहे. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना एकत्रित या 2733 जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यापेक्षा या निवडणुकीत 500 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.

Related Articles

Back to top button