देश - विदेश
रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा

- रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सण-उत्सवांच्या काळात रेल्वे स्टेशन्सवर होणारी मोठी गर्दी आणि तिकिटांसाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवीन योजना आणली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘राऊंड ट्रिप पॅकेज’ची घोषणा केली आहे.
- या योजनेनुसार, जर तुम्ही येण्या-जाण्याचे तिकीट एकाच वेळी काढले तर तुम्हाला परतीच्या तिकिटावर वीस टक्के सूट मिळणार आहे. या योजनेचा उद्देश प्रवाशांना स्वस्तात प्रवास उपलब्ध करून देऊन गर्दीची वेगवेगळ्या दिवसांत विभागणी करणे आहे, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होईल.
- रेल्वेच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत कोणताही प्रवासी येण्या-जाण्याचे तिकीट एकाच वेळी बुक करत असेल तर परतीच्या प्रवासासाठीच्या मूळ किमतीवर (बेस प्राइस) वीस टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत त्याच प्रवाशांना मिळेल, जे येण्या-जाण्याचे तिकीट एकाच नावाने आणि तपशिलांसह बुक करतील.
- दोन्ही तिकीटे एकाच क्लासची आणि एकाच स्टेशनपासून तसेच एकाच स्टेशनपर्यंतची असली पाहिजेत. या योजनेनुसार येण्याचे तिकीट १३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यानचे आणि परतीचे तिकीट १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यानचे असले पाहिजे.
- या ऑफरमुळे सणांच्या काळात प्रवाशांची गर्दी वेगवेगळ्या तारखांमध्ये वाटली जाईल आणि खास ट्रेन्सचा दोन्ही बाजूंनी योग्य उपयोग होईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.



