देश - विदेश

ब्रेकिंग! रेल्वेने वाढवले तिकीटाचे दर

  • रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे प्रवासी ट्रेनच्या तिकिटांच्या किमती वाढवणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार एक जुलैपासून वाढलेल्या किमती लागू होतील. नॉन एसी मेल/एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवासी भाड्यात एक पैसा प्रति किलोमीटरची वाढ करण्यात आली आहे. एसी क्लासच्या भाड्यात दोन पैसे प्रति किलोमीटरची वाढ होईल.
  • येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे उपनगरीय तिकिटांच्या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. पाचशे किमीपर्यंत सेकंड क्लासमध्ये प्रवासासाठी आवश्यक तिकिटांच्या किमतीही वाढणार नाहीत. सेकंड क्लासमध्ये अंतर पाचशे किमी पेक्षा जास्त झाल्यास ०.५ पैसा प्रति किलोमीटर या दराने तिकिटाची किंमत वाढेल. मासिक किंवा सिझन तिकिटांच्या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत.
  • रेल्वे नॉन एसी तिकिटांच्या भाड्यात एक पैसा प्रति किलोमीटरने वाढ करणार आहे. पटना ते नवी दिल्ली अंतर सुमारे एक हजार किलोमीटर आहे. जर तुम्ही नॉन एसी क्लासचे तिकीट घेतले तर तुम्हाला दहा रुपये जास्त द्यावे लागतील.
  • एसी क्लासच्या तिकिटांच्या किमतीत दोन पैसा प्रति किलोमीटरने वाढ झाली आहे. जर तुम्ही पटना ते दिल्ली जाण्यासाठी एसी क्लासचे तिकीट घेतले तर २० रुपये जास्त द्यावे लागतील. त्याचप्रमाणे इतर ठिकाणांसाठी तिकिटांच्या किमतीत झालेली वाढ अंतरावर अवलंबून असेल.

Related Articles

Back to top button