देश - विदेश
इसे कहते है इंडियन आर्मी

- सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने सीमेवरून होणारी घुसखोरी आणि इतर गुन्हेगारी रोखण्यासाठी एक अनोखा उपाय योजला आहे. यासाठी मधमाशांचा वापर केला जात आहे. सीमेवरील सुरक्षा वाढवण्यासाठी भारत-बांगलादेश सीमावर्ती नाडिया जिल्ह्यातील मधुमक्षिका पालन करणाऱ्या लोकांना संपर्क साधण्यात आला आहे.
- त्यांच्या मदतीने बांगलादेश सीमेवर मधमाशांचे जाळे विणण्यात येत आहे. मधमाशांमुळे बांगलादेशी घुसखोर आणि सैन्याला भारतीय भूमीवर पाय ठेवणे जिकरीचे जाणार आहे. बीएसएफच्या ३२ व्या बटालियनने हा उपाय प्रथम सुरू केला आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
- बांगलादेशासोबत भारताची ४,०९६ किलोमीटरची सीमा आहे. त्यापैकी २,२१७ कि.मी. सीमा पश्चिम बंगालमध्ये आहे. ही सीमा उंच पर्वत, नद्या, दऱ्या यांमधून जात असल्याने तिचे रक्षण करणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे या भागातून घुसखोरी होते. सीमेवरील सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने बीएसएफने आयुष मंत्रालयासोबत काम सुरु केले आहे. सीमेवर मिश्रधातूची स्मार्ट कुंपणे बसवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे.
- याबाबत पीटीआयशी बोलताना ३२ व्या बटालियनचे कमांडंट सुजीत कुमार म्हणाले, हा उपक्रम केंद्र सरकारच्या ‘वायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ (व्हीव्हीपी) अंतर्गत राबवण्यात येत आहे. बीएसएफने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मधमाशा मोठ्या प्रमाणात परागकण गोळा करत असल्याने सीमेवरील कुंपणांवर असलेल्या या पोळ्यांभोवती फुले येणारी आणि लावता येणारी औषधी वनस्पती पुरवण्याची विनंती बीएसएफने आयुष मंत्रालयाला केली आहे. स्मार्ट कुंपणांना बसवलेल्या पोळ्यांमध्ये मधमाशा स्थिरावण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- मधुमक्षिका पालनात गुंतलेल्या शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा होईल. स्थानिक मधुमक्षिका पालकांनी बीएसएफच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. दक्षिण बंगालच्या सीमावर्ती भागात प्राणी, सोने, चांदी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचे गुन्हे वारंवार घडतात. दुष्कृत्य आणि तस्कर बेकायदेशीर कामांसाठी कुंपणे कापण्याचा प्रयत्न करतात, असे अनेकदा घडले आहे.
- कुंपणांना बसवलेले मधमाश्यांचे पोळे कुंपणे कापणाऱ्या दुष्कृत्यांना रोखण्याचे काम करतील. मधमाशा दुष्कृत्यांवर हल्ला करेल. तस्करी होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणी ठराविक अंतरावर मधमाश्यांचे पोळे बसवले जातील. लाकडाच्या रचनेचा वापर करून पोळी तयार करण्यात आली आहेत. मात्र किती पोळी बसवण्यात आली आहेत याची नेमकी संख्या जाहीर केली जाणार नाही, असे सुजीत कुमार म्हणाले.



