देश - विदेश

ब्रेकिंग! पहलगाम हल्यानंतर इंडियन आर्मी ‘अ‍ॅक्शन मोड’वर

  1. पहलगाम दहशतवादी हल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये वातावरण तापले आहे. अशातच, आज सकाळपासून जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे चकमक सुरू आहे. बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. यामध्ये दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख दहशतवादी ठार झाला आहे. सुरक्षा दलांनी लष्करचा दहशतवादी अल्ताफ लाली याला ठार मारले आहे.
  2. सकाळपासून बांदीपोरा येथे चकमक सुरू आहे. बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहीम चकमकीत रूपांतरित झाली.
  3. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही चौथी चकमक आहे. काल याआधी सुरक्षा दलांनी उधमपूरच्या दुडू बसंतगडमध्ये काही दहशतवाद्यांना घेरले होते. 

Related Articles

Back to top button