देश - विदेश
ब्रेकिंग! इस्त्रायल-इराण युद्धाचा थेट परिणाम तुमच्या किचनवर होणार!

- इस्त्रायल आणि इराणच्या सुरु असलेल्या संघर्षात इराणच्या अणु ठिकाणांवर अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे आता जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशाकडून पुरवठा खंडित होण्याची भीती आणखी वाढली आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीनपैकी दोन एलपीजी सिलेंडर पश्चिम आशियातून येतात. जर या प्रदेशात तणाव वाढला आणि पुरवठा विस्कळीत झाला तर सर्वात पहिला सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. यामुळे या युद्धाचा परिणाम आता भारतातल्या एलपीजी गॅस सिलेंडरवरही होणार आहे. माहितीनुसार, सध्या देशात कमी प्रमाणात गॅसचा साठा शिल्लक आहे.
- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आयात टर्मिनल्स, रिफायनरीज आणि बॉटलिंग प्लांटमध्ये भारताची एलपीजी साठवण क्षमता राष्ट्रीय सरासरी वापराच्या फक्त १६ दिवसांसाठी पुरेशी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत देशाची स्थिती चांगली आहे. भारत दोन्हीचा निव्वळ निर्यातदार आहे. तो त्याच्या देशांतर्गत पेट्रोल वापराच्या सुमारे ४० टक्के आणि डिझेल वापराच्या सुमारे ३० टक्के निर्यात करतो.
- अमेरिका, युरोप, मलेशिया किंवा आफ्रिकेच्या काही भागांसारख्या पर्यायी स्रोतांमधूनही एलपीजी गॅस सिलेंडर आयात करता येते, पण या देशांमधून भारतात माल पोहोचण्यास जास्त वेळ लागेल. दुसरीकडे, पाईपद्वारे नैसर्गिक वायू फक्त १.५ कोटी भारतीय घरांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे देशातील ३३ कोटी एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शनसाठी हा एक पर्याय नाही. अनेक ठिकाणी सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रॉकेलचा पुरवठा बंद झाला आहे. आता जर शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला तर विजेवर स्वयंपाक करणे हा एकमेव पर्याय उरतो.


